विचार हा शब्द सुद्धा भाषेनेच दिलेला आहे, अर्थात शब्द नंतर आला पण भावना त्याही आधी होतीच.
पूर्ण वाढ झालेल्या मानवी मेंदूमध्ये हास्य, करुणा, द्वेष/राग(प्रेम), भय, मत्सर, किळस, वासना,अद्भुतता, शौर्याची भावना ही शब्दाविना/भाषेविना विकसित झालेली असते. लहान बाळाला लहानपणापासूनच जंगलाच्या हवाली केले तरी या इतक्या भावनांची त्याला जाणीव होत असते.. अगदीच प्राण्यांना सुद्धा या भावनांची जाणीव होत असते.
आपण करतो ते विचार ही या भावनांची पुढची पायरी असते, त्याला भाषेचा ठोस आधार मिळालेला असतो. भाषेंमुळे भावनांना एक वजन प्राप्त होते. भाषा हे भावना मोजण्याचे परिमाण म्हणू शकतो आपण. शेवटी भाषा हे एक माध्यम आहे जे आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाते. ज्यामुळे आपले विचार प्रगत होतात.
आणि ते विचार व्यक्त करण्याचे सगळ्यात बेसिक आविष्कार म्हणजे चित्र रेखाटणे, अश्रू, स्पर्श, आवाजाचा स्वर, नर्तन आणि त्याचा किंवा साऱ्याच कृतींचा वेग आणि चेहेऱ्यावरचे हावभाव, पडलेले खांदे, झुकलेली किंवा रोखलेली नजर... लिहिणं आणि बोलणं ही कृत्रीम गोष्ट आपण भाषेकडून शिकलो आहोत. भाषेमुळे/लिपीमुळे आपल्या भावना एनकोड करणं आणि इतरांसाठी त्या डीकोड करणं सोप्प झालं.
भाषेचा वापर आपण किती चांगल्याप्रकारे आणि यशस्वीरीत्या करू शकतो त्यावरुन आपल्या मेंदूची कार्यक्षमता ओळखली जाऊ शकते.. असे मला वाटते.
एका फेसबुक प्रश्नाने झालेलं विचारमंथन. जाणकारांनी यात अजून भर घातल्यास आवडेल*
No comments:
Post a Comment