Saturday, 11 June 2022

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा गुन्हा आहे. वेश्याव्यवसायाची भारताला पुरातन परंपरा आहे. देवदासी पद्धत पूर्वी भारतात अनेक ठिकाणी रूढ होती. फरक इतकाच की त्यावेळी स्वतः आई बाप मुलींना देवीच्या आणि म्हणजेच गावाच्या स्वाधीन करत. मग तिचे आई वडीलही तेवढेच गुन्हेगार. आणि हो, गुलाम सुद्धा! रुढींचे, परंपरांचे आणि अज्ञानाचे. आजही मुलांसाठीचे निर्णय बऱ्याचदा आई वडील घेताना दिसतात. आणि तो शिरसावंद्य मानून मुलं ऐकतात! आपल्याला गुलामीत राहायची सवय झालीये. स्वतःच्या आयुष्यावर अधिकारच नाहीये आपला. समाजाविरुद्ध बंड करून उठणारे फार कमी लोक असतात. तीळ तीळ तुटतात, भांड भांड भांडतात आणि कधीतरी असेच विरून जातात. चाकोरीतलं आपल्या मनाविरुद्ध जगणारे आपण सर्वच काही प्रमाणात वेश्या आहोत. गुलाम आहोत या समाजाचे. आपले अधिकार, हक्क आणि कर्तव्य आपल्याला माहितीच नाहीत. पुढे काही वर्षांनी आपण मोठे होतो आणि आपापले निर्णय स्वतः घेऊ लागतो. पण ते कशाच्या आधारावर? तर आपल्यावर झालेल्या संस्कारांच्या आधारावर. आणि तेच संस्कार जे समाजाच्या मान्यतांवर आधारलेले असतात! 

वेश्यांचं काय होतं? कोण मुलगी इतर चार पर्याय सहज उपलब्ध होऊ शकत असताना स्वतःहून शरीरविक्रय करायला तयार होईल? कोणत्या स्त्रीला आवडेल अभिमानाने वेश्याव्यवसाय करायला? कोवळ्या वयात तिची तस्करी होते, तिच्यावर देहविक्रयाची सक्ती केली जाते. परंतु पुढील काळात तिचे पुनर्वसन झाल्यानंतरही ती पुन्हा पुन्हा त्या व्यवसायाकडे का वळते? कारण तिला निर्णय स्वातंत्र्य नसतं. तिने नेमलेली माणसं असतात, जी गिर्हाईकांसोबतच तिची व्यसनंही पुरवतात आणि तिच्यावतीने तिचे सारे निर्णयही परस्पर घेतात. तिच्या पुनर्वसनाच्या आधी तिची व्यसनमुक्ती होणे गरजेचे आहे. वेश्यांच्या पुनर्वसनासाठी बऱ्याच स्वयंसेवी संघटना कार्यरत आहेत. त्यांचे पुनर्वसन होते, त्यांना काम मिळतं परंतु तिच्या शरीराला, तिच्याकडून मिळणाऱ्या पैशाला चटावलेले हेच पुरुष तिला पुन्हा पुन्हा शरीरविक्रय करण्यास भाग पडतात.

आपलंही काय वेगळं होतं? लहानपणीच्या इच्छा, स्वप्न त्याचं पुढे काय होतं? आपणच आपल्या स्वप्नांवर हसतो नाही का? एखादी गोष्ट आपल्याला हवी वाटते तेव्हा ती का हवी वाटते याचा विचार करायला हवा. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्याचे निर्णय आपले आपण घेता यायला हवेत. फक्त ते निर्णय योग्य असावेत याची जबाबदारी आई बाबांची. आपल्या जवळच्या माणसांना निर्णयसक्षम बनवणं हे आपलं सामाजिक उत्तरदायित्व आहे. कायदे करून व सोयी सुविधा उपलब्ध करून समाज प्रबोधन घडत नसतं, त्यासाठी विचार परिवर्तन होणं गरजेचं आहे. ज्ञान मिळवायला हवं, आपल्या हक्क, अधिकार आणि कर्तव्याविषयी जागरूक असायला हवं. आपण करत असलेली प्रत्येक कृती स्वैछिकच असायला हवी. 

आज जागतिक वेश्याव्यवसाय जागरूकता दिवस. पण तो फक्त ओळखला जातो. तो ज्या दिवशी साजरा केला जाईल तो सुदि


न.

No comments:

Post a Comment

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...