3 दिवस घरापासून लांब राहायचं! रात्री सुद्धा मला माझा एकटेपणा मिळणार नव्हता. मोबाईल ला नेटवर्क नसणार. या अगदी शुल्लक गोष्टी आहेत तरीही माझ्यासाठी या भयंकर समस्या होत्या. अगदी निघायच्या क्षणापर्यंत माझी घालमेल सुरू होती.
माणिकगड च्या वेळीसारखंच इथेही प्लॅटफॉर्म वर झोपायचं होतं. पण यावेळी मनाची तयारी होती. लोणावळा स्टेशन ला उतरल्याबरोबर थंड वाऱ्याने अर्धा ताण घालवला. जागोजागी अंगाचं मुटकुळे करून झोपलेली माणसं, बसायच्या बाकावर तरवाटलेल्या लाल डोळ्यातील जाग आणि त्यांच्या नजरा, आणि प्लॅटफॉर्म वरचा उजेड.. झोप लागणं शक्यच नव्हतं. गाड्या येत होत्या.. घाट संपल्यावर गरज नसल्यामुळे आपापली इंजिन काढून मागे सोडून पुढे जात होत्या. ओझं कुणाला हवं असतं? आपणही सोडतोच की गरज नसलेली माणसं मागे..दुनिया आपली वाटू लागली की आईचा पदर सोडतो.. हिम्मत अली की घर सोडतो ..सृष्टीचा नियम आहे तो. तो पाळायलाच हवा. दुसऱ्या दिवशी उठून माचीची वाट चालू लागलो. पहिलाच ओढा लागला तो उगम होता..उल्हास नदीचा. आणि त्यात म्हशी बसल्या होत्या. हेच पाणी भाईंदर खाडीत येतं आणि रोज सकाळी सूर्य उगवताना त्या पाण्याचं किती कौतुक करू आणि किती नको असं होतं मला. उल्हास व्हॅलीतून काय काय पचवत येते ती कोण जाणे. पण तरी चमचमत असते समुद्राला मिळेपर्यंत. ती सगळं लपवते आणि समुद्राला मिळाली की तो सगळं फेकून देतो किनाऱ्यावर. रुखवतात जपून नेलेलं अप्रूप,नंतर त्याचं काय होत? एक दिवसाचा सोहळा आणि एक दिवसाचं कौतुक! आई काकीच्या माहेरची एकतरी वस्तू मागा त्यांच्याकडे, माळवरच्या पेटीत गंजुन गेली असेल. ती त्या घराला आपलं मानते.. पण ते घर तिचं होतं का?
इथल्या माणसांनी मात्र मला आपलंसं केलं.. मी कधी मिसळून गेले मला सुद्धा आठवत नाही. शैलेश दादाच्या घरी राहिलो होतो आम्ही. ओसऱ्यांचं घर. चार भिंतींची खोली संपुर्ण घरात कुठे नाही. कोपऱ्यात चूल. शेणाने सारवलेला ओटा. निखार्यावर पापड भाजायला .. भाकरी थपताना पाहायला अशी निमित्त शोधून मी चुलीजवळ शेकत बसायचे. वरून पाणी लावलेल्या भाकरीचा वास घेतला की भूक सहन होत नव्हती. सोलार वर चालणारं वीस पंचवीस घराचं गाव पण गावकरी मात्र हौशी. त्यांचं भजनी मंडळ आहे. गावात मोजून बारा मुलं.. पूर्ण डोंगर उतरून पेटी मृदुन्ग घेऊन भजनं करायला जातात सगळेच. आम्ही आलोय म्हणून मैफिल बसली. आणि मग मात्र मला गड आवडू लागला. अंधार होता, संगीत होतं, हसून हसवणारी माणसं होती, अजून काय हवं? आपण एखादी ओळ गुणगुणतो आणि सगळेच्या सगळे गाणी म्हणू लागतात असा ग्रुप असेल तर उगाच भीत होते मी. मोकळ्या मनाने गाणी बोललो त्या रात्री आभाळ भरून आलं होतं, आणि ज्या रात्री मन भरून आलं होतं ती रात्र निरभ्र होती. तारे उगवले होते. अंधार कोरडा होता. रात्र परकी वाटत होती आणि मला ते परकेपण आवडू लागलं होतं. एक दिवस मनरंजन साठी आणि एक दिवस श्रीवर्धन साठी. वेळ जास्त असल्यामुळे सगळं पाहत अनुभवत होतो, केसात फुलं माळणं ही स्त्रीसुलभ इच्छा असते असं म्हणतात पण मला ती आजपर्यंत आयुष्यात कधी झाली नव्हती. इथे मी जागोजाग उगवलेली सोनकी आणि तेरड्याची फ़ुलं केसातून खोवत होते. पडू नये, वाऱ्याने उडू नये याची काळजी घेत होते. कोपर्या कोपऱ्यातून ओघळणारे थंड पाण्याचे झरे, पावसाच्या शिडकाव्याने ओलं झालेलं गवत, पडलेल्या झाडांवरून उलट्या छत्रीसारखं उगवलेली मश्रूम, फुलांच्या पाकळीतून जपून ठेवलेलं थेंब भर पाणी आणि परतताना विदिशाला सारखी गोड आवाजात लपून हाक मारणारा पक्षी. एकंदर सौन्दर्याची रेलचेल.
मला शब्दात पकडणं तसं पाहिलं तत् कठीणच त्यामुळे मी काही सांगताना स्पष्ट नाही म्हणणारा विरळाच, पण तेजुताई ठाम नाही म्हणाली. मी कशी आहे हे मलाच समजावून सांगताना, ते सुद्धा एक दिवसाच्या सहवासात, मी पाहतच राहिले तिच्याकडे! अंधारात सुद्धा माझ्या चेहेऱ्यावरचे सूक्ष्म बदल गांधी काकांना दिसत होते. म्हणजे मी पारदर्शक आहे तर! आपल्या मनात काय चाललंय हे कुणाला कळू नये असं आपल्याला वाटत असतं न, आणि आपल्या परवानगीशिवाय कुणी आपल्याला जाणून घेऊ इच्छितो तेव्हा आपण शांत राहू शकत नाही. पण ही पॉवर च नव्हती माझ्याकडे, खूप असहाय वाटत होतं.
दुनिया आपल्यापेक्षा फार वेगळी असते, दुनियेला आपलंसं करावं की आपण तिच्यात रममाण व्हावं? तिचं कौतुक केलं तर आपल्या मीपणाला अर्थ उरत नाही. आणि आपलं वेगळेपण जपलं तर?
असो vac सोबतचे ट्रेक्स नेहमीच लक्षात राहणारे असतात. लक्षात राहावेत. मनात राहावेत. जगून घ्यावेत.
माणिकगड च्या वेळीसारखंच इथेही प्लॅटफॉर्म वर झोपायचं होतं. पण यावेळी मनाची तयारी होती. लोणावळा स्टेशन ला उतरल्याबरोबर थंड वाऱ्याने अर्धा ताण घालवला. जागोजागी अंगाचं मुटकुळे करून झोपलेली माणसं, बसायच्या बाकावर तरवाटलेल्या लाल डोळ्यातील जाग आणि त्यांच्या नजरा, आणि प्लॅटफॉर्म वरचा उजेड.. झोप लागणं शक्यच नव्हतं. गाड्या येत होत्या.. घाट संपल्यावर गरज नसल्यामुळे आपापली इंजिन काढून मागे सोडून पुढे जात होत्या. ओझं कुणाला हवं असतं? आपणही सोडतोच की गरज नसलेली माणसं मागे..दुनिया आपली वाटू लागली की आईचा पदर सोडतो.. हिम्मत अली की घर सोडतो ..सृष्टीचा नियम आहे तो. तो पाळायलाच हवा. दुसऱ्या दिवशी उठून माचीची वाट चालू लागलो. पहिलाच ओढा लागला तो उगम होता..उल्हास नदीचा. आणि त्यात म्हशी बसल्या होत्या. हेच पाणी भाईंदर खाडीत येतं आणि रोज सकाळी सूर्य उगवताना त्या पाण्याचं किती कौतुक करू आणि किती नको असं होतं मला. उल्हास व्हॅलीतून काय काय पचवत येते ती कोण जाणे. पण तरी चमचमत असते समुद्राला मिळेपर्यंत. ती सगळं लपवते आणि समुद्राला मिळाली की तो सगळं फेकून देतो किनाऱ्यावर. रुखवतात जपून नेलेलं अप्रूप,नंतर त्याचं काय होत? एक दिवसाचा सोहळा आणि एक दिवसाचं कौतुक! आई काकीच्या माहेरची एकतरी वस्तू मागा त्यांच्याकडे, माळवरच्या पेटीत गंजुन गेली असेल. ती त्या घराला आपलं मानते.. पण ते घर तिचं होतं का?
इथल्या माणसांनी मात्र मला आपलंसं केलं.. मी कधी मिसळून गेले मला सुद्धा आठवत नाही. शैलेश दादाच्या घरी राहिलो होतो आम्ही. ओसऱ्यांचं घर. चार भिंतींची खोली संपुर्ण घरात कुठे नाही. कोपऱ्यात चूल. शेणाने सारवलेला ओटा. निखार्यावर पापड भाजायला .. भाकरी थपताना पाहायला अशी निमित्त शोधून मी चुलीजवळ शेकत बसायचे. वरून पाणी लावलेल्या भाकरीचा वास घेतला की भूक सहन होत नव्हती. सोलार वर चालणारं वीस पंचवीस घराचं गाव पण गावकरी मात्र हौशी. त्यांचं भजनी मंडळ आहे. गावात मोजून बारा मुलं.. पूर्ण डोंगर उतरून पेटी मृदुन्ग घेऊन भजनं करायला जातात सगळेच. आम्ही आलोय म्हणून मैफिल बसली. आणि मग मात्र मला गड आवडू लागला. अंधार होता, संगीत होतं, हसून हसवणारी माणसं होती, अजून काय हवं? आपण एखादी ओळ गुणगुणतो आणि सगळेच्या सगळे गाणी म्हणू लागतात असा ग्रुप असेल तर उगाच भीत होते मी. मोकळ्या मनाने गाणी बोललो त्या रात्री आभाळ भरून आलं होतं, आणि ज्या रात्री मन भरून आलं होतं ती रात्र निरभ्र होती. तारे उगवले होते. अंधार कोरडा होता. रात्र परकी वाटत होती आणि मला ते परकेपण आवडू लागलं होतं. एक दिवस मनरंजन साठी आणि एक दिवस श्रीवर्धन साठी. वेळ जास्त असल्यामुळे सगळं पाहत अनुभवत होतो, केसात फुलं माळणं ही स्त्रीसुलभ इच्छा असते असं म्हणतात पण मला ती आजपर्यंत आयुष्यात कधी झाली नव्हती. इथे मी जागोजाग उगवलेली सोनकी आणि तेरड्याची फ़ुलं केसातून खोवत होते. पडू नये, वाऱ्याने उडू नये याची काळजी घेत होते. कोपर्या कोपऱ्यातून ओघळणारे थंड पाण्याचे झरे, पावसाच्या शिडकाव्याने ओलं झालेलं गवत, पडलेल्या झाडांवरून उलट्या छत्रीसारखं उगवलेली मश्रूम, फुलांच्या पाकळीतून जपून ठेवलेलं थेंब भर पाणी आणि परतताना विदिशाला सारखी गोड आवाजात लपून हाक मारणारा पक्षी. एकंदर सौन्दर्याची रेलचेल.
मला शब्दात पकडणं तसं पाहिलं तत् कठीणच त्यामुळे मी काही सांगताना स्पष्ट नाही म्हणणारा विरळाच, पण तेजुताई ठाम नाही म्हणाली. मी कशी आहे हे मलाच समजावून सांगताना, ते सुद्धा एक दिवसाच्या सहवासात, मी पाहतच राहिले तिच्याकडे! अंधारात सुद्धा माझ्या चेहेऱ्यावरचे सूक्ष्म बदल गांधी काकांना दिसत होते. म्हणजे मी पारदर्शक आहे तर! आपल्या मनात काय चाललंय हे कुणाला कळू नये असं आपल्याला वाटत असतं न, आणि आपल्या परवानगीशिवाय कुणी आपल्याला जाणून घेऊ इच्छितो तेव्हा आपण शांत राहू शकत नाही. पण ही पॉवर च नव्हती माझ्याकडे, खूप असहाय वाटत होतं.
दुनिया आपल्यापेक्षा फार वेगळी असते, दुनियेला आपलंसं करावं की आपण तिच्यात रममाण व्हावं? तिचं कौतुक केलं तर आपल्या मीपणाला अर्थ उरत नाही. आणि आपलं वेगळेपण जपलं तर?
असो vac सोबतचे ट्रेक्स नेहमीच लक्षात राहणारे असतात. लक्षात राहावेत. मनात राहावेत. जगून घ्यावेत.